Friday, June 11, 2021

आई कुठे काय करते...

 आई कुठे काय करते...


२०१७ साली झालेल्या ' Miss World ' contest  मधे  "हरियाणा" ची डॉक्टर मानुषी छिल्लर हिने विजेते पद पटकाविले होते .

शेवटच्या  निर्णायक राऊंड मधे तिला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे ?? तेंव्हा तिचे ' winning '  उत्तर हे होते की   "सर्वात जास्त पगार " आई " ला मिळाला पाहिजे ". आईच्या कामाचे मोल नाही.

तिच्या या उत्तराने  तिने ती स्पर्धा तर जिंकलीच .बरोबर, जगात  एक नवीन विषय चर्चेला  दिला .त्यानंतर  फोर्ब्स  व्दारे  संचालित वेब साईट ' Salary • com  'वर research सुरू झाला . की एक आई जेवढं काम करते ,त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसे ठेवली ,तर त्यांना किती पगार द्यावा लागेल  ?? तेंव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता , एका भारतीय आईला ७१,०००/ अंदाजे 

एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा.••••.असा निष्कर्ष निघाला.

 तिच्या  उत्तराने ही  गोष्ट जगासमोर उजागर झाली. जगासमोर भारतीय परिवार व त्यात आईची  भूमिका समोर आली. आदि काळापासून आई हेच  काम  करते आहे रोजच, वर्षानुवर्षे, न  थकता ,   न  थांबता  आनंदाने. कुठेही उपकाराची भावना  नाही. अहंपणा नाही .कंटाळा नाही. ती सुखी  घराची  किल्ली आहे .एकाच वेळी ती  असंख्य  departments  सहज सांभाळते. सकाळ ते संध्याकाळ असंख्य काम सहज करते.अगदी काटेकोरपणे बिनबोभाट . ती घरची   Administrative officer  आहे. वेळ पडली तर डॉक्टर,  टीचर , counsellor आहे आणि कधी कधी हिटलर ही होते. जवळ जवळ  सर्वळ मंत्रालय  तिच्या कडेच असतात . घराची गृहमंत्री , वित्त मंत्री  आहे  ती. थोडक्यात घराचा भक्कम आधारस्तंभ  आहे . 

       तज्ञ, कोणत्या तरी एकाच क्षेत्रात perfect असतात. तज्ञ असतात व त्यांच्या या expertise चे भरपूर पैसेही  मिळतात त्यांना .येथे प्रत्त्येक घरची आई प्रत्येक department किती कुशलतेने सांभाळते .

                  I   think she is The Best CEO in the world .

       जगाची रीतच आहे ही .  जून्या काळापासून चालत आलेली. कुठे न लिहीलेले नियमच आहेत ते .ही सर्व कामे करण्यात तिला आनंद आहे.  समाधान आहे .एखादं काम जरी नीट झालं नाही तर ती disturb होते‌ .म्हणजे  अगदी भरलेला डबा शाळेत जाताना मुलगा विसरला, तरी ती अस्वस्थ होते .माझी कुठे चूक झाली ?? याचा विचार करते .व पुन्हा असे होणे नाही .याची काळजीही  घेते.

       या सर्व कामाचा मला मोबदला मिळावा हा विचार तिच्या मनात ही येत नाही .

 काळ कितीही बदलू दे, आधुनिकता किती ही असू दे , "आई  "आईचं राहणार आहे तशीच कर्तव्यदक्ष. आपल्या घराला घरपण देणारी, जीव ओवाळून टाकणारी ,सांभाळणारी ती 

आई असते.❤️

Thursday, June 10, 2021

आहाराचा संबंध आजाराशी असतो

 पावसाळा हा ऋतू निसर्गात सर्वत्र हिरवळ पसरवणारा असला तरी येताना तो अनेक प्रकारचे विकारही घेऊन येतो. या रोगांपासून दूर राहण्यासाठी आपण काय खावे, कसे खावे आणि कसे राहावे यासाठी आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूची ऋतूचर्या सांगितली आहे.


पाऊस पडायला लागल्यावर हवेतला दमटपणा वाढतो आणि शरीरात वातदोषही वाढतो. या काळात आपला जठराग्नी मंदावतो आणि पचनशक्ती कमी होते. परिणामी पोटाचे विकार या ऋतूत खूप वाढतात. एवढेच नाहीतर गजबजलेल्या शहरांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता, प्रदूषण यांमुळे पोटाच्या विकाराबरोबरच सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, हिवताप, स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ, उलटय़ा, जुलाब, विषमज्वर यांसारखे अनेक साथीचे रोगही बळावतात. त्यामुळे या सर्व विकारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.


आहाराचा संबंध आजाराशी असतो. योग्य आहार तर कमी विकार त्यामुळे पावसाळ्यात आहारावर नियंत्रण ठेवले नाही तर विकारांना निमंत्रण नक्की आहे. पावसाळ्यात पचनशक्ती मंद असतेच, पण पुढे ‘ऑक्टोबर हीट’ म्हणजेच शरद ऋतू ज्यात पित्तदोषाचा प्रकोप होतो, त्या पित्ताची साठवणही पावसाळ्यात शरीरात व्हायला लागते. त्यामुळे पावसाळ्यातला आहार हा पचायल हलका, ताजा आणि गरमागरम असावा. आपल्याकडे चातुर्मासात पावसाळा असतो. शास्त्रकारांनी पचन नीट व्हावे यासाठीच चातुर्मासात विविध सणांच्या निमित्ताने उपाय करायला सांगितले आहेत. त्यायोगे पोटाला न पचलेले अन्न पचवायला वेळ मिळेल आणि उपासानिमित्ताने हलके आणि कमी प्रमाणात अन्न शरीरात जाईल. परंतु आपल्याकडे याच्या नेमके उलट घडते. उपवासाच्या थाळीत काय काय असते तर, साबुदाणा खिचडी, साबुदाणा-बटाटय़ाचे थालीपीठ किंवा वडे, शेंगदाण्याची आमटी, वेफर्स, बटाटय़ाचा चिवडा असलेली मिसळ! जुन्या पिढीची अजून एक पद्धत म्हणजे उपवास सोडण्यासाठी केली जाणारी श्रीखंड, खीर, पुरण, शिरा यांसारखी पक्वान्न्ो. असा उपवास शरीरासाठी नक्कीच फायदेशीर नाही.


उपवास करायचा असेल तर वरी तांदूळ, शिंगाडा पीठ, उपवासाची भाजणी, सुरण, लाल भोपळा, राजगिरा, फळे, सुंठ पावडर घालून गरम केलेले दूध, गोड ताक, घरचे लोणी, तूप या पदार्थाचा आहारात समावेश करावा.


मांसाहार शक्यतो या ऋतूत टाळायला हवा. पचनशक्ती कमी असताना तळलेले मासे, चिकन, मटण शक्यतो खाऊ नयेत. याऐवजी मूग, मटकी, मसूर, लाल चवळी, कुळीथ यांचा आहारात समावेश करावा. तुरीची आमटी शक्यतो दुपारच्या जेवणात खावी. उडदाची डाळ, बेसन, मैदा, छोले, राजमा, वांगे, बटाटा, पांढरी चवळी, वाल पावटा हे पदार्थ वातूळ म्हणजे शरीरातील विकृत वायू वाढविणारे आहेत. त्यामुळे त्यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करावा. पालेभाज्यांमध्ये लाल माठ, चवळी, शेवग्याचा पाला किंवा टाकळ्याच्या पानांची भाजी खावी. परंतु पालक, मुळा, मेथी, शेपू, अंबाडी यांसारख्या भाज्या खाणे शक्यतो टाळावे.


गरम गरम पोळी, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, आले. लसूण, हिंग, मोहरी, मेथी, हळद, कडुिलब, कोथिंबीर, ओला नारळ या सर्वाची फोडणी दिलेल्या फळभाज्या, आमसुलाचे सार किंवा सोलकढी, तूप, जिरे, लसणीचे फोडणी दिलेले ताक, डाळ-तांदुळाची खिचडी, दलिया, उकडय़ा तांदुळाचा भात, पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण, जिरे यांची चटणी अशा पदार्थाचा रोजच्या जेवणात वापर करावा.


पावसाळ्यात उकळवून पाणी पिणे हे केव्हाही उपयोगी असते. अगदी फिल्टरमधून शुद्ध केलेले पाणी असले तरी १० ते १५ मिनिटे उकळवून आणि गाळून ते पाणी प्यावे. आहारातील अपथ्याप्रमाणेच पावसाळ्यातील बऱ्याच रोगांचे कारण हे दूषित पाणी असते. फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पदार्थ, पेय, सरबते, पाणी याचा वापर कटाक्षाने टाळावा. लोणची, पापड हेदेखील पावसाळ्यात शक्यतो खाणे टाळावे. वात आणि कफविकार असलेल्या व्यक्तींनी तर पावसाळ्यात कायम कोमट पाणी पिणे (तापवून थंड झालेले नाही) निरोगी आरोग्यासाठी खूपच उपयोगी पडते. चहा करताना त्यात आले, गवती चहाची पाने जरूर घाला. दूध पिताना पाव चमचा हळद आणि सुंठीची पावडर घालून ते कोमटच प्यावे. पाऊस सुरू झाला की पहिल्या पावसानंतर हापूस आंबा खाऊ नये.


लोक सर्व पदार्थ खातात म्हणून तुम्हीही खाऊ नका. आपले राहणीमान, पचनशक्ती कशी आहे, आपल्या प्रकृतीला काय चालते, आपल्याला वयोमानानुसार काय पचू शकते याचा सारासार विचार करून कधी, काय आणि कसे खावे हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे.

Monday, June 7, 2021

परत येण्याची वेळ

 परत येण्याची वेळ


आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास,

“परत फिरण्याची” तयारी सुरू करा....आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर ! 


का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे?

जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉल्स्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते..


परत येणे ..... कधीच सोपे नसते 


एक माणूस राजाकडे गेला. म्हणाला मी गरीब आहे ,

माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे.   

राजा दयाळू होता. त्याने विचारले: कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?

माणूस म्हणाला: कसायला थोडी जमीन द्या. 

राजा म्हणाला: उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तु चालु शकशील, धावु शकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल. परंतु लक्षात ठेव, जिथुन धावणे सुरू करशील तिथेच  सूर्यास्तापर्यॅत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही!


माणूस खुष झाला. तो सूर्योदय होताच पळायला लागला .. पळत राहीला ; सूर्य माथ्यावर चढला होता .. पण माणूस धावयचं थांबला नाही .. अजून थोडी मेहनत .. मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती ! 


संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, त्याला परत यावं लागेल, नाहीतर त्याला काही मिळणार नाही! त्याने पाहिले की तो खुप दूर आला आहे .. आता परत यायचे होते .. सूर्य पश्चिमेकडे वळला होता .. तो थकला होता. परत पोहोचायचे होते.. पण वेळ वेगाने निघुन जात होती .. अजून थोडी मेहनत..न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला .. पण आता श्वास घेणं कठिण झालं होतं. तो खाली पडला  .. आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला ! 


राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकार्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला:


याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना  इतका पळत होता! 


आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत: ला ठेवून विचार करा. आपण तीच चूक करीत नाही ना ? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीम आहेत! आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आम्ही करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही.


मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो..आजपर्यंत मी कुठे पोचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन?  हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा! 


सूर्यास्ताची वेळ  लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे  हे माहित नाही. 

थोडं थांबा, आजुबाजुला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचं राहुन गेलाय. किमान आज या एका क्षणापुरतं खुष व्हा.

🙏🏻🙏🏻