Saturday, August 28, 2021

तीन प्रकारची लोकं

 टायटॅनिक डुबताना सगळ्यात शेवटचा इलाज म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला. 

नऊ किलोमीटर अंतरावरच्या एका जहाजाने ते पहिले पण ते जहाज समुद्री जीवाचं तस्करी करणारे होते, त्यांनी विचार केला आपण मदतीला गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊन नुकसान होईल ते गेले नाही. 

अठरा किलोमीटरवर कॅलिफोर्निया नावाचे जहाज होते त्यांनीसुद्धा मदतीचा प्रकाश पाहिला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत सकाळी जाऊ असे म्हणून टाळले व सकाळी गेले तोवर जहाज बुडून चार तास झाले होते. 

68 किलोमीटर वर कॅथरीन नावाचं जहाज होते, त्यांनीही प्रकाश पाहिला व ते त्वरित मदतीसाठी धावले, पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरीपण त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले. 

आयुष्य पण असचं आहे 

आपल्याला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात 

1) त्यांच्या स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार नं करणारे 

2) त्यांच्या वेळेनुसार, सवडीप्रमाणे मदत करणारे 

3) कुठलाही विचार नं करता तुमच्या मदतीला बेधडक हात देणारे,

पहिल्या दोन प्रकारच्या व्यक्ती जर योगायोगाने आयुष्यात परत आल्यातर त्यांच्यासाठी परत भावनिक होने म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय. 

3 ऱ्या प्रकारातली व्यक्ती चं मोल नं जाणणं म्हणजे आयुष्याचं स्वतःच्या हाताने मातेरं करणं होय.


Friday, August 27, 2021

व्यापार आणि दया

 भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, "भाजी घ्यायची का मावशी?"

आई आतून नेहमी सारखी ओरडली, "काय आहे भाजीला?"


"गवार हाय, तंबाटी, पालक,...." एवढे बोलताच आई म्हणाली, "थांब आले"


दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, "पालक कसा?"


"रुपयाची गड्डी" (भाजीवाली)

"पन्नास पैशाला दे, चार घेते" (आई)

"नाय जमणार मावशी" (भाजीवाली)

"मग राहुदे" (आई)


भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. "बारा आण्याला देईन".

"नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते" (आई)

"नाय जमणार" (भाजीवाली)

आणि पुन्हा गेली


थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तीला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून परिक्षण करुन चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले. भाजीवाली भारा उचलायला लागताच तीला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, "जेवली का नाही?"


"नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेउन , मग सैपाक, मग जेवण" भाजीवाली म्हणाली


"थांब जरा. बस इथं. मी आणते." म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळी पण दिली. पाणी पिऊन भाजीवाली गेली.


मला राहवलं नाही. मी आईला विचारले, "तु एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केली पण नंतर जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तीला खायला दिले."



आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले...


व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये



संग्रहित

🙏🌹🌹🙏

Tuesday, August 24, 2021

गांवांचा वेगळेपणा

● UNIQUE VILLAGES IN INDIA*

● गांवांचा वेगळेपणा ......


१)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)

    संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.

    गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही.

    गांवात चो-या नाहीत.


२)• शेटफळ (महाराष्ट्र)

    प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य 

    असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.


३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र)

    भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे. 

    ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.

    सर्वाधिक GDP असणारं खेडं.


४)• पनसरी (गुजरात)

    भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.

    गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,

    Wi-Fi सुविधाही आहेत.

    गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात.


५)• जंबुर (गुजरात)

    भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक

    "आफ्रिकन" वाटतात.

    [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]


६)• कुलधारा (राजस्थान)

    "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.

     घरे बेवारस सोडलेली आहेत.


७)• कोडिन्ही (केरळ)

     जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.


८)• मत्तूर (कर्नाटक)

    दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी

    "संस्कृत" भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.


९)• बरवानकाला (बिहार)

    ब्रम्हचा-यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून 

    गांवात लग्न-सोहळाच नाही.


१०)• मॉवलिनॉन्ग (मेघालया)

      'आशिया'खंडातील सर्वात "स्वच्छ" गांव.

      पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील

      महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.


११)• रोंगडोई (आसाम)

      बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,

      अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव.

       असं लग्न हा 'ग्रामसण'च असतो.


१२)• कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)

        Korlai  village

       स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही "पोर्तुगिझ:'" भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.

१३)मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश)

 एका गावातून ४६ पेक्षा जास्त  IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे...

१४) झुंझनु (राजस्थान)

फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती...

६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू...

••••••••••••••••••••••••••••

●असाच वेगळेपणा जपणारी आणखीही गांवे असतील, माहिती मिळवा, आणि इतरानांहीमाहित करून द्या.

Sunday, August 22, 2021

चूको मत चौहान….

ही खालील घट्ना आपल्याला पाठ्य पुस्तकातून नाही शिकवली?
फक्त "मोहमद घौरी" याने श्री पृथ्वी राज चौहान याचे डोळे अफगाणिस्तान येथे नेऊन फोडले आणी शारिरीक छळ करून मारले...हेच शिकविले आहे...पुढे मोहमद घौरी चे काय झाले? त्या ला कोणी मारले...वाचा हा इतिहास...जो आपल्या पासून लपवला आहे???




चूको मत चौहान….

अफगाणिस्तानातील काबूलच्या अंधार कोठडीत एक नर-सिंह उद्विग्नपणे येरझाऱ्या घालीत होता…. ज्या हातांतील तलवारीने शत्रूंच्या टोळधाडीला पळता भुई थोडी करून चारीमुंड्या चीत केले होते तेच हात साखळदंडांनी करकचून बांधले गेले होते… पळत्या घोड्यावर मांड ठोकणाऱ्या पायात भारी भक्कम बेड्या टाकून त्यांना जायबंदी केले गेले होते…. त्याच्या फोडल्या गेलेल्या डोळ्याच्या खोबणीत आजही प्रतिशोधाचा अंगार प्रज्वलित होता… अशा या बहाद्दर वीराचे नाव होते "हिंदशिरोमणी पृथ्वीराज चौहान"!

अजयमेरूच्या (अजमेर) या राजपूत वीराने परदेशी इस्लामिक आक्रमक मोहम्मद घौरी ला सोळा वेळा पराभूत केले होते आणि प्रत्येक वेळी उदारपणा दाखवत त्याला जिवंत सोडले, परंतु सतराव्या वेळेस त्यांचा पराभव झाला, तेव्हा मोहम्मद घौरी ने त्यांना सोडले नाही. त्याने त्यांना बंदिवान करून काबुल-अफगाणिस्तानात नेले. सोळा वेळेस पराभूत झाल्यावर ज्या घौरीने दया म्हणून प्राणाची भीक मागितली तोच घौरी बंदी केलेल्या पृथ्वीराजांवर आसूड ओढत होता आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी अनन्वित छळ करीत होता. "प्राण गेला तरी बेहत्तर पण इस्लाम स्वीकारणार नाही" असे म्हणून डोळ्यास डोळा भिडवणाऱ्या पृथ्वीराजांचे डोळे फोडण्यात आले होते! 

पृथ्वीराजांचा इमानी राजकवी “चंद बरदाई”, आपल्या राजाला, पृथ्वीराजांना भेटायला थेट काबूलला पोहोचला! तेथील कैदेत असताना पृथ्वीराजांची दयनीय अवस्था पाहून चंद बरदाईच्या मनाला तीव्र धक्का बसला… आपल्या राजाचे असे हाल करणाऱ्या घौरीचा त्याने सूड घेण्याचे ठरवले… आपली योजना त्याने आपल्या राजांना सांगितली आणि विनंती केली कि, "हे राजा, आपण या घौरीला इतकेवेळा माफ केले, पण आता या सापाच्या अवलादीचा वध करण्याची वेळ आली आहे!" 

चंद बरदाई घौरीच्या दरबारात आला…. त्याने घौरीला सांगितले की, “आमचा राजा एक महाप्रतापी सम्राट आहे… तो एक महावीर योद्धा तर आहेच पण माझ्या राजाची तुला अवगत नसलेली एक खासियत म्हणजे, आमचे राजे ध्वनी-लक्ष-भेदनात प्रवीण आहेत! नुसत्या आवाजाच्या रोखाने बाण चालवून अचूक सावज टिपण्यात ते तरबेज आहेत! जर तुमची इच्छा असेल तर आपण त्याच्या शब्दभेदी बाणांची अद्भुत कामगिरी स्वतः पाहू शकता! 

यावर घौरीचा विश्वासच बसेना, तो म्हणाला, "अरे, मी तर तुझ्या राजाचे दोन्ही डोळे फोडले आहेत… मग तो आंधळा कसा काय धनुष्यबाण चालवणार?”
 
चंद बरदाई अदबीने उत्तरला, "खाविंद, तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष ही विद्या पाहू शकता… माझ्या राजांना इथे दरबारात बोलवा… काही अंतरावर लोखंडाचे सात तवे ठेवा…. आणि त्यांचा आवाज करायला सांगा…. माझे राजे आपल्या धनुष्यबाणाने त्या सातही तव्यांचे भेदन करतील!" 

घौरी कुत्सितपणे हसला नि म्हणाला, "तू तर फारच प्रशंसक आहेस तुझ्या राजाचा! पण एक लक्षात ठेव…. जर का तुझा राजा हि कला दाखवू शकला नाही, तर त्याच दरबारात मी तुझे आणि तुझ्या राजाचे डोके उडवून लावीन!” 

चंद बरदाईने घौरीची अट मान्य केली आणि बंदिगृहात आपल्या लाडक्या राजांच्या भेटीला आला. तिथे त्याने पृथ्वीराजांना घौरीसोबत झालेली बातचीत सांगितली, दरबाराची सविस्तर मांडणी विशद केली आणि दोघांनी मिळून आपली योजना आखली….

ठरल्याप्रमाणे घौरीने दरबार भरवला आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आमंत्रित केले…. भालदार चोपदार यांनी मोहम्मद घौरी दरबारात येत असल्याची वर्दी दिली…. आणि घौरी आपल्या उच्च आसनावर विराजमान झाला! 

चंद बरदाईच्या निर्देशानुसार सात मोठ्या लोखंडी तव्यांना ठराविक दिशेने व अंतरावर ठेवण्यात आले होते…. पृथ्वीराजांचे डोळे काढून आंधळे करण्यात आले असल्याने त्यांना चंद बरदाई च्या साहाय्याने दरबारात आणले गेले. घौरीला “शब्दभेदि बाणाचे दृश्य” नीट पाहता यावे म्हणून त्याच्या उच्च स्थानासमोरील मोकळया जागेत पृथ्वीराजांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती… ते स्थानापन्न झाल्यावर त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण देण्यात आले…

चंद बरदाई घौरीला म्हणाला,"खाविंद, माझ्या राजांचे साखळदंड आणि बेड्या काढण्यात याव्यात, जेणेकरून त्यांना आपल्या या अद्भुत कलेचे प्रदर्शन करता येईल" 
घौरीला त्यात काहीच धोका वाटलं नाही कारण, एक तर पृथ्वीराज डोळ्याने ठार आंधळा… चंद बरदाई सोडला तर त्याचा कोणी सैनिक नाही… आणि माझे सारे सैन्य माझ्याजवळ दरबारात उपस्थित आहे! त्याने लगेच पृथ्वीराजांना मोकळे साकारण्याचे फर्मान सोडले. 

चंद बरदाईने आपल्या परमप्रिय राजाला चरणस्पर्श करून सावध राहण्याची विनंती केली… त्याने आपल्या राजाचे गुणगान करणाऱ्या बिरुदावल्या म्हंटल्या… आणि त्याच बिरुदावलीच्या माध्यमातून चंद बरदाईनेआपल्या राजाला संकेत दिला….. 

“चार बांस, चौबीस गज, अंगुल अष्ठ प्रमाण।
ता ऊपर सुल्तान है, चूको मत चौहान।“

अर्थात् चार बांस, चोवीस गज आणि आठ वित एव्हढ्या उंचीवर सुल्तान बसला आहे…. तेव्हा राजे चौहान… कोणतीही चूक न करता तू नेम साधून आपले लक्ष्य साध्य कर!

या सांकेतिक बिरुदावलीतून पृथ्वीराजांना मोहम्मद घौरीच्या बसण्याच्या अंतराचा अचूक अंदाज आला. 
 
चंद बरदाईने घौरीला पुन्हा विनंती केली," महाराज, माझे राजे हे आपले बंदी आहेत, त्यामुळे आपली आज्ञा झाल्याशिवाय ते शस्त्र चावणार नाहीत, तेव्हा आपण स्वतः त्यांना ऐकू जाईल एव्हढ्या उच्चरवाने माझ्या राजांना बाण चालवण्याची आज्ञा द्यावी"

घौरी या प्रशंसेने भारावून गेला आणि त्याने मोठ्याने उद्घोषणा केली, "चौहान चलावो बाण!... चौहान चलावो बाण!!.... चौहान चलावो बाण!!!"

घौरीचा आवाज ऐकल्या बरोबर पृथ्वीराज चौहान यांनी आपल्या धनुष्यावर चढवलेल्या बाणाची प्रत्यंचा ओढली आणि गौरीच्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला नि त्या बाणाने अचूकरित्या घौरीच्या छातीचा वेध घेतला! 

काय होतंय हे कळायच्या आत, "या अल्लाह! दगा हो गया” अशी किँकाळी फोडत मोहम्मद घौरीचा देह सिंहासनावरून खाली कोसळला! 

दरबारात एकाच गोंधळ उडाला…. सारे सरदार हादरून गेले… तीच संधी साधून चंद बरदाई धावत आपल्या प्राणप्रिय राजाच्या जवळ आला… त्याने घौरी मृत होऊन कोसळल्याची बातमी आपल्या राजाला सांगितली… आपल्या बहादूर राजाला वंदन केले… दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले… चंद बरदाई आणि पृथ्वीराजांना याची कल्पना होती कि, घौरी चा मृत्यू झाल्यावर त्याचे सैन्य आपल्याला छळ-छळ करून ठार मारणार… त्यामुळे आधीच ठरल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांवर वार करून वसंत पंचमीच्या शुभ दिवशी माता सरस्वतीला आपल्या प्राणांचे अर्घ्य दिले!

पृथ्वीराज चौहान आणि कवी चंद बरदाई यांची हि आत्मत्यागाची शौर्य गाथा आपल्या भारतीय मुलांना अभिमानाने कथन करणे, त्यांच्यापर्यंत पोचणे आवश्यक आहे, म्हणून आज आपल्यासमोर आणली आहे. आपण देखील ही शौर्यगाथा आपल्या मुलांसोबत शेअर कराल हीच अपेक्षा. धन्यवाद!

वंदे मातरम!
ज्येष्ठ कृष्ण