Saturday, October 24, 2020

काय आहे घटस्थापना ?

 काय आहे घटस्थापना ?

                                  

घट्स्थापनाः पारंपारिक व शास्त्रीय (वैज्ञानिक)  कृषक  संस्कृती...!  


बिजपरिक्षण, पाणी परिक्षण, माती परिक्षण, आणी हवामान परिक्षणाची बौद्ध कालीन कृषि परंपरेची चिकित्सा पध्द्ती.


घट्स्थापना ही कृषि आधारित वैज्ञानिक संकल्पना कृषिप्रधान परंपरेचा पुरस्कर्ता महान राजा म्हणजे  बळीराजाने निर्माण केलेली बियाणे, माती, पाणी आणी हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक परंतु शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे.


घट्स्थापना करतो म्हणजे आम्ही नक्की काय करतो?


प्रथमता एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलुन घटाचे विसर्जन केले जाते.


आता या प्रक्रियेतील शास्त्रीय चिकित्सा पाहुयात.


घट स्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणी रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्या आधी केली जाते.


घटा साठी वापरण्यात येणारी माती ही शेतातील काळी माती वापरली जाते. परंतु ही माती इतर कोणाच्या शेतातील घेतली जात नाही तर शेतकरी आपल्याच शेतातील किंबहुना ज्या शेतात तो रब्बी पिक घेणार आहे त्याच शेतातील माती वापरली जाते.


कारण ज्या शेतात तो पिक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे परिक्षण असते.


या मातीत मिसळलेले बियाणे हे कोणतेही बियाणे वापरले जात नाही तर रब्बी हंगामात जे पिक शेतकरी त्याच्या शेतात  पेरु शकतो तेच आणी त्याच्याकडे उपलब्ध असणारे बियाणेच शेतात टाकले जाते. त्या मागचा हेतु त्याच्या शेतात वापरले जाणा-या बियाणाची उगवण क्षमता किती आहे हे तपासणे असते.


घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते कुठलेही वापरले जात नाही तर शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते. घट हा मातीचा आणी कच्चा भाजलेलाच वापरला जातो. तो इतर कोणत्याही धातुचा वापरायचा नसतो. कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक असते जेणे करुन त्याच्या खाली शंकु आकारात ठेवलेल्या मातीत  आणी त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते.


घट नऊ दिवसच का बसवला जातो, त्याचे कारण बियांना रुजुन अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागतो.


घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. परंतु नवव्या दिवशी शेजारील पाच व्यक्तिंकडून तळी उचलली जाते म्हणजे  घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते.


जे पिक जोमाने आले आहे ते पिक शेतात पेरण्यासाठी सर्वानुमते निवडले जाते. या सर्वानुमते घेतलेल्या निर्णायाला चांगभल, येळकोट अशा घोषणा देवून सर्व मान्यता दिली जाते. सर्वमान्य असलेले पिक उदो उदो करुन उपटले जाते.


या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपी किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतो किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. त्यामुळे घरोघरी घेण्यात आलेल्या परिक्षणाचे निकाल एकत्र करुन अभ्यासने सोपे जाते.


गावातील सार्वजनिक ठीकाणी एकत्र येवून त्याच दिवशी गाव शिवारातील पिक पाण्याचे नियोजन केले जाते.


या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणी बिज परिक्षण जसे होते त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे पण परिक्षण केले जाते.


माझ्या शेताच्या मातीत,  माझ्याकडे उपलब्ध असलेले बियाणे , माझ्या शेताला उपलब्ध असलेल्या पाण्यावर , या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे या सर्वांची चिकित्सा करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी वापरण्यात येणारी पारंपारीक परंतु शास्त्रावर आधारलेल्या या चिकित्सा पध्दतीची जोपासणा प्रत्येक  बहुजन सण उत्सवाप्रमाने याही आणि उपासा-तापासाच्या  नावाखाली रसातळाला जावू न देता तेवढ्याच शास्त्रीय (कृषक वैज्ञानिक) पध्दतीने जोपासणे गरजेचे आहे.


"इडा पीड़ा टळोआणि बळीचे राज्य येवो। 


       💐 🌱🙏🏻🌱 💐

Tuesday, October 20, 2020

चौकट

 चौकट...!

(काही कटू अनुभव जीवनातील...)


दुसऱ्यासाठी काही करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं...


अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो... झटतो...



 प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो... कोणताही स्वार्थ नसतांना...


मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात. ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो.. यांचं कर्तव्यच आहे...

करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो... 

आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं हा निर्मळ प्रयत्न असतो...

गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो. तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो... 

ज्याला समजून घ्यायचंय तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो...


 ज्याला समजून उमजुन घायचंच नाही तो शब्दाचा किस पडतो... शब्दांनी घायाळ करतो...

नात्यांची खरी मेख तर इथेच आहे...  


माझं माझं करता करता आपण आपल्यांना दुखावतो...

घालून पाडून बोलतो.. परिणाम फक्त वाईटच होतात... 

संबंध दुरावले जातात.. 

आपुलकीतला रस संपत जातो... उरते ती फक्त निराशा...

हल्ली तर नातं आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात... 

जणू पैसा म्हणजे सर्वस्व... अमक्याने अमक्या कार्यक्रमात आहेर दिला नाही म्हणून राग... रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही तर राग... एखाद्या प्रसंगांत मागे उभे राहिले नाही म्हणून राग...


निर्व्याज प्रेम .. जिव्हाळा.. काळजी.. कुटुंबातील प्रेम हे सगळंच विरळ होत चाललंय...


जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात जी आपली काळजी करतात.. जीव ओतून आपल्याला घडवतात.. वेळप्रसंगी आपल्याला भल्यासाठी रागावतात पण परत मायापण करतात... त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये...


कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही...

हा समजूतदारपणा अंगी यायला हवा... 

आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही...  

मिळेल ते अनुभव.. मिळेल ती उपेक्षा.. मिळेल ते प्रेम.. आदर.. मिळेल ती अनुभूती घ्यावी...  

प्रवाहात मुक्त जगावं... 

जीवनात सगळेच रंग हवेत... निराशेतही आशा आहेच की... 

त्या ऊर्जेची वाट बघायची.. कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर..  पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशिवाय...

कौतुक करणारं... पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच ना....! 

आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात अश्रू येणारी... 

आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं ही हवीतच अवतीभवती...! 


सौजन्य:-

Unknown:- whats app, facebook

नाहीतर यश, पैसा खूप मिळवला तरीपण जर माणसंच नसतील प्रेम करणारी ....  तर .... त्या सारखा दरिद्री तोच...!

Monday, October 19, 2020

बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण

 बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण



१०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!

धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!


तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!

शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!


माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!

मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!

खर सांगतो गड्यानो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!


आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!

गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!


पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!


महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!

जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!

ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!

काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणस असतील ती…!

एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?

स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!

आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ …?

काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!

हि वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??

बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते….!

(Copy Paste)....

      

           

संपूर्ण आयुष्यातील एक एक क्षण स्वराज्यासाठी अर्पण करणारे शिलेदार बहीर्जी नाईक यांचे समाधी स्थळ .....

 बानुरगड . ता : खानापूर . जि : सांगली.

🚩🚩 जय जिजाऊ , जय शिवराय , जय महाराष्ट्र....🚩🚩

   शाहिस्तेखानाने चाकणच्या भुईकोटाचा ताबा पंचावन्न दिवसांच्या तिखट प्रतिकारानंतर मिळवला (१४ ऑगस्ट १६६०) आणि या कोटाचे हवालदार काहीसे हताश होउन राजगडाच्या पायर्‍या चढत होता, आता राजे काय शिक्षा सुनावताहेत या चिंतेने ग्रासलेला हा किल्लेदार राजांसमोर उभा राहिला आणि राजांनी त्यांना शिक्षा सुनावली, आदिलशाही सरहद्दीवरच्या भुपालगडाची किल्लेदारी. हे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. राजांना अश्याच ह्ट्टी किल्लेदाराची आदिलशाही सरहद्दीवर आवश्यकता होती.शिवाजी राजांनी हा गड अफजलखानाच्या वधानंतर १५ नोव्हेंबर १६५९ ते मार्च १६६० या दरम्यान ताब्यात घेतला असावा.

पुढे मात्र याच फिरंगोजींवर आणि भुपालगडावर एक बिकट प्रसंग ओढावला. स्वराज्याचे युवराज संभाजी राजे शत्रुला मिळाले. सातार्‍याजवळच्या संगम माहुलीजवळ नावेने नदी ओलांडून ते दिलेरखानाच्या छावणीत सामील झाले. कडव्या दिलेरखानाच्या मनात मात्र शंका असावी. हा संभा खरेच आपल्याला मिळालाय कि हि बाप-बेट्यांची एखादी चाल याची पडताळणी त्याने करायची ठरविले. आणि स्वारीसाठी गड निवडला, "किल्ले भुपाळगड". दिलेरखान आणि संभाजीराजांच्या फौजा भुपाळगडावर चालुन आल्या. ( २ एप्रिल १६७९) सुरवातीला फिरंगोजीनी तिखट प्रतिकार केला. मोघलांची प्रचंड हानी झाली. अल्प शिबंदी असुन हा मराठा लढतोय हे पाहून दिलेरखानाने संभाजी राजांना पुढे केले. स्वामीभक्त फिरंगोजींपुढे मोठा पेच पडला. युध्द करावे तर समोर साक्षात युवराज आणि शरणागती पत्करावी तर दिलेरसारखा कट्टर शत्रु उभा ठाकलेला. संभाजी राजांनी किल्ला खाली करायचा हुकूम केला अन्यथा मोठा हल्ला होईल असा निरोप दिला. अखेरीस फिंरगोजी ,किल्ल्याचे सबनीस विठ्ठलपंत भालेराव यांच्यासोबत रातोरात गड सोडून रायगडाला निघून गेले. किल्लेदारच निघुन गेल्यावर हा गड पडायला किती वेळ लागणार? (१७ एप्रिल १६७९) पण पठाणी डोक्याच्या दिलेरखानाचे ईतक्यावर कसले समाधान होणार होते. त्याने शरण आलेल्या सातशे मावळ्यांचा एक हात कलम करायची आज्ञा दिली. बाकीच्यांना कैद तरी केले गेले किंवा गुलाम तरी केले. संभाजी राजांना हा साराच प्रकार असह्य झाला, पण निमुटपणे पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. रायगडावर महाराजांना हे समजतातच ईतर गडांना पत्रे पाठ्विली गेली, "गड लढवावा, अणमान करो नये". याचे वर्णन बसातीनुस्सलातीन, तारीखे दिल्कुशा या मुघल ग्रंथकारांची आणि मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीत आहे.

हा गड ताब्यात घेतल्यानंतर दिलेरखानाने त्याची तटबंदी पाडून टाकली असे जे सांगितले जाते ते चुकीचे असावे. अर्थात या घटेनेनंतर हा गड मोघलांच्या ताब्यात फार काळ राहिला नसावा. कारण सभोवतालचा प्रदेश आदिलशाही आणि मराठ्यांच्या ताब्यात होता. आणि मोघलांचा सगळीकडे पराभव होत होता.

यानंतर मात्र एका वेगळ्याच कारणासाठी या गडाचा उल्लेख येतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नात सुरवातीपासून साथ दिलेले जोडीदार, बहिर्जी नाईक. अफजल वध असो, लालमहालातील कामगिरी असो, सुरतेवर स्वारी असो किंवा आग्र्याहून सुटका या सर्वच थरारक घटनांमधे बहिर्जींचे योगदान मोलाचे होते. या बर्हिंजींचा शेवट या भुपालगडावर झाला. यामधे तीन मतप्रवाह आहेत.

काहीजणांच्या मते भुपाळगडावर हेरगिरी करताना ते पकडले गेले आणि शत्रुने त्यांना मारुन टाकले.

तर दुसरा मतप्रवाह सांगतो कि बहिर्जी लढाईत जखमी होउन ईथे आले आणि ईथे त्यांनी प्राणोत्क्रमण केले.

तर काही बखरींच्या मते, इथे बर्हिजी झाडीत लपलेले होते, शत्रुने भाल्याने झाडी तपासताना, भाला लागून त्यांचा मृत्यु झाला.

ईतिहास काहिही असला तरी बहिर्जी नाईकांच्या अस्थी भुपालगड आज शिरावर मिरवतोय. 'बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी मांजर्‍या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले.तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले, "भुपाळगड". शिवाजी महाराजांना विजापूरवर लक्ष ठेवण्यासठी एका किल्ल्याची आवश्यकता होती. बाणुरगडाचा हा डोंगर शिवरायांच्या मनात भरला व तेथे किल्ला बांधण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी व कवठे महांकाळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा चार तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळ्गड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमरक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्व होते.

या ईतिहासप्रसिध्द परंतु काहीशा दुर्लक्षित किल्ल्यावर जायचे  मार्ग 

१) पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कराडहुन विटा-खानापुर-भिवघाट-पळशी-भुपालगड असे येता येईल. विट्यावरून दिवसाला तीनवेळा थेट भुपालगड साठी सकाळी ८.३०,११.३० व ४.०० अश्या तीन बसही आहेत.वाटेत रेवणसिध्दाचे मंदिरही पहाता येईल.

२ ) सांगली-तासगाव-भिवघाट-पळशी-भुपालगड असा पर्यायही आहेच.


Credtis:-

Unknown facebook