चालणे म्हणजे दुसरे हदय
.... 🚶🏾♀️🚶🏾♂️🏃🏾♀️🏃🏾♂️👩🏾🦯🧑🏾🦯🚶🏾♀️🚶🏾♂️🏃🏾♀️🏃🏾♂️
आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले "दुसरे हृदय" म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.
सर्वाँना हृदयाचे कार्य काय असते ते ठाउक असेलच.
हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहातं नाही.
पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो.
होय. खर आहे.
*आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे.*
हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात.
रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.
पायाच्या पोटरी मधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.
त्यांना " मसल विनस सायनस असे" म्हणतात.
ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्या मध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदया कडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावा मुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.
घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो.
आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपा यातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते.
रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात.
आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या ( DVT, deep vein thrombosis ) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते.
एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते.
याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फफुसात जाऊन फसू शकतात ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.
जर पोटरितील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे,
घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे,
खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.
*थोडक्यात - चालत रहा,* शक्य असल्यास धावत रहा.
निरोगी आणि सुदृढ रहा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*👩🏾🦯🏃🏻♂️चाला आरोग्यासाठी.* 🚶🏾♀️🏃🏻♂️
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात ते पहाटे मिळणार नाहीत.
जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चाललात तर तुम्हाला आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतील...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
...होय सकाळी कोवळे ऊन येत असताना सहा/ साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सकाळी चालणे आवश्यक का आहे?*
जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला विटामिन डी भरपूर प्रमाणात मिळेल,
त्यामुळे शरिरातील विटामिन डी ची कमतरता भरून निघेल.
दररोज सकाळी चालण्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल.
अंधारात ऑक्सीजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो, कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच विटामिन डी खूप आवश्यक असते, जर तुम्ही योग्य प्रमाणात कोवळे ऊन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियम चा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*स्ट्रेस / तणाव मुक्ती साठी उपयोगी.*
मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे अत्यंत उपयुक्त आहे, किबहुना आवश्यकचं आहे , यामुळे सकाळचे सकाळी चालण्याने मिळणारे सर्व फायदे डिप्रेशन कमी करण्यासाठी उपयोगी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर डायबिटीक आहात तर त्या व्यक्तीने कोवळ्या उन्हामध्ये जर फिरले तर डायबेटिस, ब्लडप्रेशर आणि हृदयरोग त्याचबरोबर मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सकाळीच का चालायचे?*
सकाळी हवेमध्ये प्रदूषण कमी असते, वातावरणात शांतता असते, स्फूर्ती प्रदान करणारे असते, त्याचबरोबर शरीरास व्यायाम होतो. ज्याचा फायदा तुमची ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी होतो यामुळे तुमची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि प्रतिकारशक्तीही वाढते, फक्त चालताना एकमेकांशी गप्पा मारू नयेत हे महत्त्वाचे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*चालण्याचे सर्वसाधारण फायदे.*
१) त्वचा चमकदार होते,
२) हृदयाचा स्वास्थ्य चांगले राहते,
३) मधुमेह नियंत्रणात राहतो,
४) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त,
५) मेंदूची कार्यक्षमता वाढते,
६) झोप चांगली लागते,
७) प्रतिकारशक्ती वाढते,
८) कोलेस्ट्रॉल कमी होते,
९) कॅन्सर चे पेशंटना उपयोगी,
१०) मेंदूची कार्यक्षमता वाढते,
११) प्रतिकारशक्ती वाढते,
१२) हृदयाची कार्यक्षमता वाढते,
१३) थकवा दूर होतो,
१४) शरीरात स्फूर्ती येते,
१५) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत,
१६) चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते.
१७) सर्व प्रकारच्या
*आजारांपासून मुक्त राहण्यासाठी उपयुक्त.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एकूणच तुमच्या संपूर्ण शारीरिक स्वास्थ्यासाठी दररोज सकाळी कमीतकमी (45 मिनिटे 90 मिनिटे) चालणे आवश्यक आहे....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*चालणे सुरू करताना काय आहे आवश्यक*
१) एक जोडी स्पोर्ट्स शूज,
२) शॉर्ट किंवा लेगिन्स,
३) शॉर्ट टी-शर्ट,
४) महिलांसाठी स्पोर्ट्स ब्रा हेअर बँड ,
५) स्पोर्ट्स वॉटर बॉटल
आणि
६) तुमचा उत्साह...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🚶🏾♀️🏃🏾♂️ *चाला आरोग्यासाठी....*🚶🏾♂️🏃🏾♀️
*( सुबह की हवा ; सव्वा लाख की दवा...)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!*
अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते.
हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे.
चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तरुणांनी पण याचा फायदा घ्यावा. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो.
*वेगाने चालण्याचे फायदे -*
*1)* आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते.
*2)* रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
*3)* रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
*4)* दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
*5)* रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
*6)* सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
*7)* हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
*8)* चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
*9)* सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
*10)* चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
*11)* चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
*12)* मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
*13)* वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
*14)* चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
*15)* चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
*16)* दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.
*17)* चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
*18)* झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.
*19)* नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
*20)* नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
*21)* नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
*22)* नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
*23)* हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
*24)* नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.
*25)* मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
*26)* नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
*27)* नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
*28)* चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
*29)* दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
*30)* नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
➖➖➖➖🙏🏾🙏🏾➖➖➖
No comments:
Post a Comment